सोमवार दि.७ एप्रिल २०२५ ते बुधवार दि.९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.०० ते ५.३० या वेळेत हे शिबिर घेतले जाईल.
प्रवेश फी प्रत्येकी रु. ६००/- फक्त (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) फक्त ४० जणांनाच प्रवेश.
खाली दिलेल्या फॉर्म च्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा. त्वरा करा.
https://forms.gle/reCYb88qDGwk2MtX7
(अधिक माहितीसाठी संपर्क क्र. कु.तेजश्री भोसले – ७४९८१८७४१४)
अमर हिंद मंडळ, दादर या समाजसेवी संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बालनाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर १५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत होईल. हे शिबीर ८ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी असून, शिबिराच्या संचालिका लीला हडप तर व्याख्याते म्हणून संजय क्षेमकल्याणी, राजीव जोशी, सम्राट साळवी , ओंकार जाधव, मुक्ता बाम, सुमीत पाटील, रवींद्र ढवळे, दत्ता सावंत, रमेश तांबे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शिबीर सहाय्यक :राजेंद्र कर्णिक, समीर चव्हाण, तेजल देशपांडे, दीपक गिरकर, सुभाष तोडणकर आहेत. बालनाट्याची सर्वांगीण प्राथमिक ओळख,लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, प्रात्यक्षिकांसह व्याख्याने ही या शिबिराची वैशिष्ट्ये आहेत. शिबिरार्थींच्या बालनाटीकांच्या सादरीकरणाने शिबिराचा समारोप होणार आहे.
शिबीर शुल्क :- प्रत्येकी १०००रुपये आहे.
अधिक माहितीसाठी – रवींद्र ढवळे – ९९२०५७२९७४, तेजल देशपांडे – ९८२०७४०००४, समीर चव्हाण – ९८२१८१२३३८
यांच्याशी संपर्क साधावा आणि खाली दिलेला फॉर्म भरून नोंदणी करावी.
नोंदणी करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर स्वातंत्र्य चळवळींचे वारे जोरदारपणे वाहत होते. फाळणीनंतरच्या जातीय दंग्यांच्या काळात हिंदू-मुसलमानांचा परस्परांवरील विश्वास उडाला होता. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली आणि गस्त, पहारे सुरू केले. यातूनच हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांची व प्रकाशभाईंची ओळख झाली. गस्त आणि पहा-यांच्या निमित्ताने हुतूतूचे सामने भरवण्यापासून सुरू झालेल्या कार्यातून मग चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. या अनुषंगाने बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. प्रकाशभाई मोहाडीकरांनी ‘अमर हिंद मंडळा’ची घटना, नियम यांचा आराखडा आपल्या सहका-यांसमोर मांडला. तो एकमताने मंजूर झाला आणि २६ जानेवारी १९४७ रोजी ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे ठरविले. मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळाला स्वतःची जागा मिळावी यासाठी इंजिनीयर नानासाहेब मोडक, काकासाहेब गाडगीळ, डॉ.राऊत आणि इतरांनी प्रयत्न केले आणि आज ज्या जागेत मंडळाची वास्तू उभी आहे ती जागा मंडळाला मिळाली.
सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ