अमर हिंद मंडळ, दादर या संस्थेच्या स्थापनादिनी म्हणजेच २६ जानेवारीला महाराष्ट्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक संस्थांचा सन्मान करण्यात आला.
मानपत्र, स्मृतिचिंन्ह आणि रु. १,००,०००/- (रु.एक लाख फक्त) आर्थिक मदत असे या सत्काराचे स्वरूप असेल. या उपक्रमाचे २०१९ हे पहिलेच वर्ष आसून सन्माननीय सर्वश्री दीपक करंजीकर(लेखक, अभिनेते,) सायली पेडणेकर(शिक्षण तज्ञ), दिनकर रायकर(संपादक लोकमत ), नेहा खरे (आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी) व संजय कृष्णाजी पाटिल(लेखक, माजी संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय व उपायुक्त महाराष्ट्र सेल्सटॅक्स)यांच्या समितीने पुरस्कारासाठी खालील संस्थांची निवड केली गेली आहे.
“निर्धार प्रतिष्ठान” विरार ( मतिमंद मुलांचे कायम निवासी केंद्र)
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळ, औरंगाबाद, (दुर्गम परिसरातील गरजूंसाठी आरोग्य,शैक्षणिक सुविधा, महिलांसाठी कौशल्य निर्माण सोयी व मदत)
स्नेहग्राम विद्यालय, बार्शी, सोलापूर (अनाथ मुले,कैद्यांची मुले,एकल पालकत्व आदींचे पालन पोषण)
शबरी सेवा समिती, डोंबिवली(ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, शैक्षणिक उपक्रम,कृषिविकास व स्वावलंबन, महिला सक्षमीकरण यावर भर).
छायाचित्रे